दिलीप कांबळे, साम टीव्ही
पुणे: मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण पाणलोट क्षेत्रात 24.07 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू असून उष्णतेच्या झळा बसू लागल्यात त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन पाणी पातळी कमी होऊ लागलीये. सध्या धरणातील पाणीसाठा हा जून अखेरीस पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्याने काढला आहे. तरी वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाई ला सामोरे जावं लागेल त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी पवना पाटबंधारे यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
मावळ आणि मुळशी तालुक्यातील दहा गावांना सिंचनासाठी आणि पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त 27.15 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने कासारसाई पाटबंधारे खात्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन शेतकरी तसेच दहा गावातील कारखानदार नागरिकांना केलं असून मान्सून चा पाऊस लांबणीवर गेल्याने पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता कासारसाई धरण प्रशासनाने घेतली आहे.
मावळ तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे आंध्रा धरणात सध्या 33.38% इतका पाणीसाठा शिल्लक असून जूनच्या अखेरीस पुरेल इतका पाणीसाठा धरणात पुरेसा असला तरी या धरणाच्या पाण्यावर संपूर्ण तळेगांव आंबी एमआयडीसी, तसेच मावळातील काही गावे आणि पिंपरी-चिंचवडच्या काही भागाला हे धरण पाणीपुरवठा करते. या धरणातील पाणी पुढे इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. जर वेळेत पाऊस पडला नाही तर पाणी टंचाई होऊ नये त्यामुळे आंध्रा पाटबंधारे खात्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.