सोलापूर, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान मानलं जाणारं उजनी धरण सोलापूरच्या नागरिकांसाठी शाप ठरायला लागलंय... हा शेवाळासारखा तवंग दिसतोय... तो फक्त तवंग नाही तर चक्कं विष आहे विष.... हे पाणी पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठीही घातक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय..
एवढंच नाही तर उजनीचं दुषित पाणी पिल्याने सोलापूरात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण आढळत असल्याचं आमदार देवेंद्र कोठेंनी अधिवेशनात सांगितलं... आणि राज्यात एकच खळबळ उडाली... महाराष्ट्रातील सर्वात मोठं 117 टीएमसी क्षमतेचं उजनी धरण... सोलापूर, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा सुजलाम् सुफलाम करण्यासाठी बांधण्यात आलं... मात्र गेल्या 30 वर्षांपासून एमआयडीसीतील दुषित पाणी नद्यांमार्गे उजनीत येत आहे... याच दुषित पाण्यामुळे उजनीतील मासे मेल्याचं समोर आलं...
त्यावरुनच जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनीही उजनीचं पाण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचा इशारा दिला होता.. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात दररोज 60 पेक्षा जास्त कॅन्सरचे रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.. त्यामुळे उजनी धरणात दुषित पाणी सोडून सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपन्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.