Badlapur- Navi Mumbai Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur- Navi Mumbai Highway: प्रवास होणार सुपरफास्ट! बदलापूर ते नवी मुंबईदरम्यान ८ पदरी महामार्ग, फक्त २० मिनिटांत पोहचा; कसा असेल प्रोजेक्ट?

MMRDA New Project: बदलापूर ते नवी मुंबईदरम्यान सरकार ८ पदरी महामार्ग तयार करणार आहे. यामुळे बदलापूरकर आणि नवी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे.

Priya More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून घोषणांचा पाऊस, नवनव्या प्रोजेक्टला मंजुरी दिली जात आहे. आता ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठी राज्य सरकार खूपच फायदेशीर असा नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. बदलापूर ते नवी मुंबईदरम्यान सरकार ८ पदरी महामार्ग तयार करणार आहे. यामुळे बदलापूरकर आणि नवी मुंबईकरांचा प्रवास खूपच वेगवान आणि सुखकारक होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बदलापूर- नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग म्हणजेच अॅक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली आहे. या महामार्गाचा फायदा बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुंबई आणि नवी मुंबईकरांना होणार आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबईत येण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेत ६० मिनिटांचा तर नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेमध्ये ३० मिनिटांची बचत होणार आहे.

एमएमआरडीएने बदलापूरची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना यांच्याशी जोडणी देण्यासाठी हा २०.६ किमी लांबीचा ८ पदरी महामार्ग हाती घेतला आहे. या प्रोजेक्टसाठी १०,८३३ कोटी रुपये खर्च लागणार आहे. तर या महामार्गाच्या बाजूला स्थानिक वाहतुकीसाठी सर्व्हिस रोडचा देखील समावेश असणार आहे. अ‍ॅक्सेस-कंट्रोल्ड महामार्गासाठी डोंगराखालून ३ किलो मीटर लांबीच्या बोगद्याची उभारणी केली जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएला २०० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे अ‍ॅक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई-बदलापूर आणि पुढे विरार-अलिबाग असाही प्रवास वेगवान होणार आहे. त्यामुळे याचा फायदा या भागातील नागरिकांना देखील होणार आहे. बदलापूर-नवी मुंबई विमानतळ दरम्यानच्या 'अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड' महामार्गाला प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यामुळे आता हा प्रकल्प प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीस सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट पाच वर्षांत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

एमएमआरडीए महानगरचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की, 'अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड' महामार्गासारखे महत्त्वाचे दळणवळण प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दळणवळण सुधारणे, आर्थिक विकासाला चालना देणे आणि प्रत्येक प्रकल्प क्षेत्राच्या नैसर्गिक आणि सामाजिक घटकांची काळजी घेत तो प्रकल्प अंमलात आणण्याचे आमचे ध्येय आहे. या महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्याचसोबत प्रवाश्यांचा प्रवास देखील सुसाट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT