Yavatmal Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage: पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावांत तीव्र पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंती

Yavatmal News : यंदा सरासरीपेक्षा कमी यामुळे राज्यातील सर्वच भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच अनेक भंगार पाणी टंचाईचा सामना करावा लागत

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : यंदाच्या कमी पावसाचा फटका सर्वत्र बसत आहे. यात यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील (Yavatmal) पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावात तीव्र पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. (Latest Marathi News)

यंदा सरासरीपेक्षा कमी (Rain) पाऊस झाल्यामुळे राज्यातील सर्वच भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच अनेक भंगार पाणी टंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत आहे. नदी, धरणातील पाणी साठा कमी होत असल्याने पाण्याची समस्या पुढील दोन महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. या करीता टंचाई आराखडा आखून त्रनकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदी काठावरील ४२ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून  पाटबंधारे विभागाचे कर्मचारी सध्या निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने पैनगंगा नदीत पाणी सोडण्यास अडचण येत आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर कडक ऊन्हात पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. ४२ गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ऐन निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महिलेसोबत डीजीपी ऑफिसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत दिसले, व्हिडिओ व्हायरल, नंतर आयपीएसकडून मोठा खुलासा अन्...; प्रकरण काय?

Thane Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार? ठाण्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट

एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह; प्रत्येकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या

Palak Soup Recipe: पालकची भाजी आवडत नाही? मग घरीच बनवा टेस्टी अन् पौष्टिक सूप, मुलं परत परत मागतील

Maharashtra Live News Update: उबाठाचे नगरसेवक नॉट रिचेबल नाहीत, 6 नगरसेवक पक्षाच्या कार्यलयात असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT