Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : यंदा उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. उन्हामुळे धरण. तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी (Washim) आटत आहे. वाढत्या तापमानामुळे वाशीम जिल्ह्यातील पद्म तलावातील माशांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. 

वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम बघायला मिळतोय. पदमपुराणात उल्लेख असलेल्या वाशिम शहरातील भगवान पदमेश्वर येथील पद्म तलावातील पाणी आटल्याने मोठ्या प्रमाणात माशाचा (Fish) मृत्यू झाल्याचं समोर आलंय. विदर्भात मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. याचा परिणाम तलावातील पाण्यावर झाला. (Temperature) तापमानामुळे तलावातील पाणी बाष्पीभवनामुळे आटून माशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. 

दोन कुंडातच पाणी 

वाढत्या तापमानामुळे आताही मासे मरण्याचा प्रमाणात वाढ होत आहे. आता उरलेल्या फक्त दोन कुंडामध्ये थोडे पाणी शिल्लक असल्याने त्या कुंडात जीवित असलेल्या माशांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT