Vegetables Price hike Saam Tv
महाराष्ट्र

Vegetable Rate: अरे बापरे! कांदा ५० तर भेंडी ७० रूपये किलो; पावसाळ्याच्या तोंडावरच भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Vegetable Rate Increase: भाजीपाल्यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. तीव्र ऊन आणि पाणीटंचाईचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

Siddhi Hande

भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. भाजीपाला उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचाच परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर होत आहे. भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.

छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजीपाला उत्पादनाला गेल्या गेल्यात तीव्र ऊन आणि पाणी टंचाईचा जबरदस्त फटका बसला. ऊन्हामुळे भाजीपाला पिवळा पडत होता आणि पाणी नसल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत होती. त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा आवक कमी झाली आहे. कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

कोथिंबीर, हिरवी मिरली, कारलं, शेवगा यांसारख्या भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. राज्यात टॉमेटो ४५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर शिमला मिर्ची एक किलो ७२ रुपये, कारलं एक किलो ८० रुपयांनी विकले जात आहे. शेवग्याची किंमत दुप्पट झाली असू एक किलो शेवगा ६० रुपयांना विकला जात आहे. अदरक २१० रुपये प्रति किलो विकले जात आहे. कोथिंबीरीची जुडी जवळपास ३०-४० रुपयांना विकली जात आहे.

कांद्याची किंमत वाढली असून एक किलो कांदा ५० रुपयांना विकला जात आहे. बटाट्यांची किंमत ३४ रुपये तर भेंडी १ किलो ७० रुपये झाली आहे. सर्वच भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाज्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणाटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे शेतजमिनींना योग्य पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. येत्या काळात भाजीपाल्यांचे दरात घट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

SCROLL FOR NEXT