
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला
भाजपचे मंगेश रामचंद्र वाकडीकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली उमेदवारी
रायगडच्या पेन मधील केळवणे मतदार संघातून निवडून आलेले मंगेश वाकडीकर यांना संधी
अध्यक्षपदासाठी प्रस्थापित अनेक चेहरे असताना मंगेश वाकडीकर या सर्वसामान्याला संधी दिल्यामुळे अनेकांची संधी हुकली..
आज रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित..
उपाध्यक्षपदाची अद्याप घोषणा नाही......
आखाती देशातील युद्धाचा परिणाम लहान मोठ्या उद्योगाना देखील बसतोय.सोलापुरातील महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड युद्धजन्य परिस्थितीमुळे गोडाऊनमध्येच पडून आहेत.या पापड उद्योग समुहाच्या माध्यमातून जवळपास 6 हजार महिला काम करतात.रमजान महिन्यात आखाती देशातून विशेषतः दुबईतून मोठी मागणी पापडसाठी असते.काही व्यापाऱ्यांनी पापडसाठी आधीच ऑर्डर दिली होती.त्यामुळे जवळपास 2 कोटींचा पापड पॅकिंग करून तयार आहे. मात्र युद्धमुळे एक्स्पोर्ट बंद असल्याने एक्स्पोर्टर आता फोन ही उचलायला तयार नाही. त्यामुळे या कोट्यावधी रुपयांच्या पापडचे करायचे काय? असा सवाल या उद्योगासमोर आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कमर्शियल गॅसचा तुटवडा
हॉटेल व्यवसायिकांसह अनेक उद्योग अडचणीत
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टला देखील गॅस पुरवठ्याची अडचण
केवळ दोनच दिवस पुरेल इतका गॅस साठा
श्री महालक्ष्मी अन्नछत्रात राज्यभरातील चार ते पाच हजार भाविक घेतात रोज अन्नाचा लाभ
अन्नछत्राला गॅस पुरवठा करावा अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
रायगडमध्ये बेमोसम धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी रायगडला कडक उन्हाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि आज थंडी नसताना दाट धुक पसरल आहे. निसर्गाच्या या लहरी पणाच सर्वांना अश्चर्य वाटत आहे.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील गटातील तीन पंचायत समिती सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय खेळी यशस्वी सांगोल्याच्या इतिहासात पहिल्यांदा होणार भाजपचा सभापती
आज सांगोला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची होणार निवड....
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी सांगोल्यातील महायुतीच्या प्रमुख नेते यांची समन्वय बैठक
या बैठकीत सांगोला पंचायत समितीच्या सभापती पदाची पहिली संधी भारतीय जनता पक्षाला देण्याचा सर्वानुमते निर्णय
जवळा पंचायत समिती गणातील पूनम इंगवले या भाजपच्या पहिल्या सभापती होण्याचा मान मिळवणार असल्याची माहिती तर नाझरे गणातून विजयी झालेले शिवसेनेचे अजय सरगर हे उपसभापती म्हणून विराजमान होणार असल्याचे निश्चित
केंद्र सरकारच्या महत्वकांशी प्रधानमंत्री धन- धान्य कृषी योजनेसाठी महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला विशेष स्थान मिळाले आहे या योजनेच्या माध्यमातून पुढील सहा वर्षात जिल्ह्यातील शेतीचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.साडेतीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे आर्थिक बळ दिले जाणार आहे.
लातूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे., वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, शहरातील प्रमुख चौकांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी "फ्री लेफ्ट टर्न" संकल्पना राबवण्यात येईल, अनाधिकृत पार्किंग वर कारवाई करण्यात येईल, आणि रस्त्यावरील संकेतचिन्ह ,झेब्रा क्रॉसिंग यांचे नूतनीकरण करण्यात येईल असे महत्त्वाचे निर्णय या समितीच्या बैठकीत पार पडले आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविक मारहाण प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू
चौकशीचा कल भारतीय संविधानाच्या ‘आर्टिकल १५’ उल्लंघनाकडे
भाविकाला दर्शनापासून रोखणे म्हणजे धार्मिक स्थळी प्रवेश नाकारणे, या दृष्टीने तपास सुरू
व्हीआयपी दर्शन पासमध्ये घोटाळ्याचा झाल्याचा चौकशी अधिकाऱ्यांना संशय
तीन महिन्यांचे CCTV फुटेज आणि लेजर बुक चौकशी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले
काच पासवर अनेकांना प्रवेश दिला का? चौकशी अधिकाऱ्यांकडून तपास सुरू
देवस्थान, पुजारी, अधिकारी यांच्या माध्यमातून पासशिवाय प्रवेशाच दिला जात असल्याचा संशय
VIP पासमुळे देवस्थानच्या उत्पन्नात येणारा पैसा दुसऱ्या कुणाच्या खिशात जातोय का? तपास सुरू
पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या
आमदार रोहित पवारांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
पुण्यातील रिंग रोड, तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग, पुणे शिरूर उन्नत महामार्गाला अजित पवारांचे नाव द्या
आमदार रोहित पवाराने नितीन गडकरींची भेट घेऊन केलीनाव देण्याची मागणी
धाराशिव मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली तीन दिवसापासून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे.अजित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे.त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करण्यात यावेत तसेच या दुर्घटनेस कारणीभूत असणाऱ्या VSR कंपनीवर देखील कारवाही करून दुर्घटनेची निःपक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे.
पुढील दोन दिवस उन्हाचा कडका,विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान 40 पार जाण्याची शक्यता.
पुढील दोन दिवस उन्हाचा कडका,विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान 40 पार जाण्याची शक्यता
तर 13 ते 15 मार्च दरम्यान मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता
विदर्भासाठी पावसाचा येलो अलर्ट... हवामान विभागाचा इशारा
फळ बागांचे आणि उन्हाळी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता
बाईट एस. डी. सानप,हवामान विभाग
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक ॲक्शन मोडवर आलेले आहेत त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय वनविभागाकडून घेतले जात आहेत अशाच प्रकारे सभागृहामध्ये बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी वनविभागाच्या भविष्यातील योजना आणि निधी उपलब्धतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे नमूद करत, त्यांनी विविध प्रकल्पांसाठी सुमारे १४,००० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे जाहीर केले.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रात्री अचानक अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीला भेट देत सोमवारी भीषण आग लागलेल्या श्री गणेश केमिकल कंपनीची पाहणी केली. यावेळी अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचं फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट झालं आहे की नाही, याचा अहवाल ८ दिवसात सादर करण्याचे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन गट आमने सामने येत तुफान दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी गोळीबार झाल्याच्या चर्चा सुरू असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भर चौकात उघडपणे दगडफेक होत असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्येही मोठी चिंता पसरली आहे.सलग दुसऱ्या दिवशी शहरात अशा प्रकारे दगडफेक होत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच दोन गट आमनेसामने येत दगडफेक करत असतील तर पोलिसांचा धाक उरला आहे का,असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
अंबरनाथ शहरात सध्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल्समध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक हॉटेल मालकांना आपल्या हॉटेलचा मेनू अर्धा करावा लागला असून काही पदार्थ देणे बंद करण्यात आले आहे. ग्राहकांचीही गैरसोय होत असून व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून संबंधित गॅस वितरक आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
मिकल कंपन्यांकडून मानवी वस्तीचं संरक्षण झालं पाहिजे, ही आमची भूमिका असून काही इंडस्ट्री जाणीवपूर्वक काही करत असतील, तर एमआयडीसी त्यांच्यावर कारवाई करेल. तसंच इन्शुरन्ससाठी आगी लावण्याचा प्रकार होत असेल, तर आहे त्यापेक्षाही अधिक कडक कारवाई करू, असा इशारा यावेळी उदय सामंत यांनी दिला. तर सामंत यांना व्यवस्थित माहिती देण्यास अधिकारी कमी पडल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांची माहिती नसणं ही शोकांतिका असल्याचं उदय सामंत त्यांनी म्हटलं. अधिकारी किती सजग आहेत, ते पाहण्यासाठीच मी इतक्या रात्री आलो असून भविष्यात लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी योग्य माहिती दिली पाहिजे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनाही योग्य माहिती असली पाहिजे, असे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. उद्योगमंत्र्यांनी अचानक केलेल्या या पाहणी दौऱ्यामुळे अधिकारी मात्र चांगलेच कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.