Supreme Court On Local Bodies Election: Saam Tv
महाराष्ट्र

Local Bodies Election: कामाला लागा! मुंबई, पुणे, ठाणे ते नाशिक नागपूरच्या पालिका निवडणुका 'या' तारखेला जाहीर होणार

Supreme Court On Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला ४ महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

Priya More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुका लवकरच होणार आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पुढच्या ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला ४ आठवड्यांच्या आत तारीख जाहीर करण्यास देखील सांगितले आहे. म्हणजेच, मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एनके सिंह यांच्या खंडपीठाने आज महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देश दिले. तसंच, चार महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले. बांठिया आयोगाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या निकालावर निवडणुका अवलंबून असतील आणि या आदेशामुळे पक्षांनी उपस्थित केलेल्या वादांना बाधा येणार नाही, असेही या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आताच कामाला लागावे लागणार आहे. कारण कधीही निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यासाठी चार आठवड्यांच्या कालावाधी दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान 'या निवडणुका अडवून ठेवण्यात कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही.', असे सांगितले. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवायी करावी, असे देखील कोर्टाने सांगितले आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या ५ वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या निवडणुकीची घोषणा कधी होते याकडे सर्वच राजकीय पक्षांसोबत जनतेचे लक्ष लागले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर पंचायतीच्या निवडणुका आता चार महिन्यांच्या आत होणार आहे. आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT