Pahalgam Terror Attack Saam tv
महाराष्ट्र

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे पळाले? धक्कादायक माहिती आली समोर

Pahalgam Terror Attack News update : : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर कुठे पळाले, याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. दहशतवादी हल्ल्यात नवनवी माहिती उघड होत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कुठे पळाले, याविषयी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे.

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी म्हटलं की, 'दहशतवादी हल्ला पहलगाममध्ये झाला. त्यामागे पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा हात होता, यात कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. पाकिस्तानी सैन्याच्या नेतृत्वाखालीच आयएसआय काम करतं. पाकिस्तानी सैन्य त्यांना मदत करतं.ते भरती,पैसे देऊन उग्रवादी बनवलं जातं. त्यांना सहा महिने ट्रेनिंग दिली जाते.

'पाकिस्तानमध्ये असतील त्यांना एलओसीमधून घुसण्यास मदत करतात किंवा त्यांना डोंगर डोंगरामध्ये लपण्याची जागा दाखवतात. ज्यावेळी हल्ला करायचा, त्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचतात. आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीशिवाय कुठलाही हल्ला शक्य नाही, त्यांना अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाते. पाच जणांनी हल्ला केला, यापैकी तीन पाकिस्तानी आणि दोन जण भारतीय काश्मिरी आहेत.

'तीन दहशतवाद्यांमधील पाकिस्तानी पैकी मुसा हा एसएससीमधील कमांडर आहे. एसएसजीचे कमांडरचं ट्रेनिंग खडतर असतं. भाडोत्री सैन्य घेतलं जातं, ते पैसे कमावण्यासाठी असे काम करतात. त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा कंट्रोल असतं. टी आर एफ हा लष्करी तोयबाचा ग्रुप आहे. हे सगळे पाकिस्तानी सैन्याच्या हाताखाली काम करत असतात. हल्ला झाला, त्याला पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्यच जबाबदार आहे, असे महाजन यांनी सांगितले.

'आपण आता वेगवेगळी पावले उचलले आहेत. पाकिस्तानी सैन्याचे नुकसान जास्तीत जास्त करायचे. त्यांचे लढण्याची क्षमता कमी करायची.आपण बदला घ्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानचे नुकसान करणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यावेळी जे युद्ध होईल, ते जास्त मोठे होईल. पाकिस्तानचे जास्त नुकसान केलं जाईल, असं पण म्हटलं जातं की, या युद्धामध्ये पाकिस्तानचे तीन तुकडे होतील, असंही भाकीत महाजन यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT