Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यात काँग्रेसला मोठं खिंडार, आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर

Big Jolt to Congress: राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. सांगलीतील बडा नेता पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना हा मोठा धक्का असणार आहे.

Priya More

Summary -

  • काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत.

  • भाजपच्या नेत्यांसाठी पृथ्वीराज पाटील यांनी घरी भोजन कार्यक्रम आयोजित केला.

  • यापूर्वी कैलास गोरंट्याल यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता

  • पाटील भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसेल.

राज्यात काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक नाराज नेते पक्षाची साथ सोडत महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. नुकताच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर आता आणखी एक बडा नेता काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत आहे. सांगलीतील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील हे पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात काँग्रेसला भाजप दुसऱ्यांदा जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. विश्वजित कदम याचे कट्टर समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार पडणार आहे. विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार तसेच सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यासोबत अनेक दिग्गज नेते भोजनासाठी येणार आहेत.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भाजपचे दिग्गज नेते जेवणासाठी येणार असल्यामुळे सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे म्हटले जात आहे. जर पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये गेले तर हा विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना जोरदार धक्का असणार आहे. ते भाजपमध्ये गेले तर सांगलीमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांनी ३१ जुलैला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा जालन्यामध्ये काँग्रेससाठी मोठा धक्का होता. तर जालन्यात भाजपची ताकद वाढली. विधानसभा निवडणुकीपासून ते काँग्रेस पक्षात नाराज होते. गोरंट्याल यांच्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्ली घटनेचे नांदेडमध्ये पडसाद

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार

Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

SCROLL FOR NEXT