नाशिक विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. गीते बंधूंनी निवडणुकीतून माघार घेतलेली असली तरी महायुतीच्या नेत्यांमधील मत विभाजनाची धाकधूक अद्याप संपलेली नाही. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता जोरदार 'हॉटेल पॉलिटिक्स' सुरू झाले असून महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी पूर्ण केली आहे.
निवडणुकीच्या रणनीतीसाठी नाशिकमध्ये काल रात्री महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्वाची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार राहुल ढिकले, पंकज भुजबळ, नितीन पवार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मत फुटू नये यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली.
महायुतीचे मतदार फुटू नयेत म्हणून आज नाशिकमधील महापालिका नगरसेवक आणि नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींना पुढील 4 दिवसांसाठी एकत्रित सहलीला नेण्यात येत आहे. या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत हे बारीक लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही नेत्यांनी स्वतःफोन करून सूचना दिल्या आहेत.
गीते बंधूंनी माघार घेतल्यानंतर वरवर जरी महायुतीचा रस्ता सोपा दिसत असला तरी आतून मात्र नेत्यांमध्ये मोठी धाकधूक आहे. बंडखोरीच्या छायेतून आणि गुप्तमतदानातून होणारे संभाव्य मतविभाजन टाळण्यासाठीच महायुतीने हे 'हॉटेल पॉलिटिक्स सुरू केल्याची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.