Shreya Maskar
खूप जास्त-जड जेवण करणे, अत्यंत वेगाने खाणे, साखर, रिफाइंड कार्ब्स, अतिरिक्त फॅट्स आणि सोडियमने भरलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो.
रक्तदाब वाढल्यामुळे चयापचय क्रियेवर ताण येतो, परिणामी जेवण संपवल्यानंतर काही तासांतच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
खूप मोठे किंवा नेहमीपेक्षा जास्त जड जेवण केल्याने रक्त पचनसंस्थेकडे वेगाने जाते, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर अचानक तीव्र ताण येतो.
काही मिनिटांत जेवण संपवल्याने मेंदूला पोट भरल्याची नोंद करता येत नाही, ज्यामुळे अति खाणे, रक्तातील साखरेत तीव्र वाढ आणि त्वरित चयापचय क्रियेवर ताण येतो.
जड जेवणानंतर लगेच झोपल्याने सामान्य रक्ताभिसरण आणि पचनक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे अंतर्गत दाब आणि आम्लपित्त वाढते. परिणामी हृदय संबंधी आजार उद्भवतात.
जेवणासोबत साखरयुक्त पेये, पांढरा ब्रेड किंवा पेस्ट्री खाल्ल्याने ग्लुकोजमध्ये वेगाने वाढ होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते आणि ताण येतो.
खारट प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करणे टाळा. अनेकांना जेवणासोबत चिप्स, चिवडा खाण्याची सवय असते. स्नॅक्स, फास्ट फूड किंवा डबाबंद सूपमुळे रक्तदाब त्वरित वाढतो. तळलेले पदार्थ रक्तदाब वाढवतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT : रात्रीच्या 'या' वेळेत वाढतो हार्ट अटॅकचा धोका, 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा