Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल

Rajesh Sonwane

जळगाव : जेईई परीक्षेत कमी गुण मिळाले. यामुळे नैराश्येत गेलेल्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत आत्महत्या (Jalgaon) केल्याची घटना घडली. यश गणेश खर्चे (वय १८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जळगावच्या मेहरुण येथील जोशीवाडा परिसरात यश खर्चे हा आई-वडिलांसह वास्तव्यास होता. मेहरु परिसरात असलेल्या राज विद्यालयात १२ मध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान १३ फेब्रुवारीला जेईई परीक्षेचा (Student) निकाल लागला. या परीक्षेत यशला कमी गुण मिळाले होते. यामुळे तो नैराश्येत होता. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेच्या पूर्वी १३ फेब्रुवारीला कुटुंबीयांसह त्याने रात्री जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी (ता.१४) सकाळी यश खाली न आल्याने त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली. बराचवेळ दार ठोठावून आवाज दिला, तरी प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला. रूममध्ये मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर आईने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी धाव घेत यशला खाली उतरवून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT