मोबाईल वाजला... कानाला लावला.... ज्याची बघत होता वाट.. तीच बातमी आली कानावर मग काय दणक्यात जल्लोष सुरु... एकमेकांना पेढं भरवलं.... तोंड गोड केलं... कपाळाला लावला विजयाचा गुलाल... अन् मारली जोरदार मिठी....
आता तुम्ही म्हणाल नेमकं घडलंय तरी काय? अरं भावा पहिल्या पासनं एकत्र असणाऱ्या तीन दोस्तांनी मारली बाजी... अन् मिळवली न्यायाधीशाची खुर्ची... हे तिघं मैत्रर शुभम, सागर अन् अक्षय जाम जिगरी यारी... पेशानं वकिल... पण जिद्द मोठ्या हुद्द्यावर जायची... गोरगरीब जनतेल्या न्याय द्यायची....
मग काय तिघांनी सुरु केला अभ्यास अन् दिली स्पर्धा परीक्षा. यशाच्या शिखरावर जायचं तर अपयशाच्या पायऱ्या तुडवाव्याच लागत्यात... जवा अपयश आलं तेव्हा तिघांनी एकमेंकाना धीर दिला. यशा गोड पेढा भरवला... इतकचं काय तर सोशल मीडिया चार पाच वर्ष राम राम ठोकत अन् आपलं ध्येय साध्य केलं
शिरुरच्या या तिघांची कहानी फक्त यशाची नाही...तर ती हाय एक उहारण कट्टर दोस्तीचं... दोस्तीच्या मार्गावरुन जाताना एकमेकांना सावरण्याचं...अन् यशाच्या शिखरावर उभं राहून लाखो जनतेला न्याय देण्याचं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.