Ambadas Danve Saam tv
महाराष्ट्र

Ambadas Danve News: शासन दारी गेलं असतं तर मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ आली नसती; अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा

पिकं हातची गेलेली आहेत, कृत्रिम पाऊस होत नाही. शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

मुंबईत मंत्रालयात मंगळवारी अमरावती येथील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आक्रमक होत संरक्षण जाळीवर उड्या मारल्या. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देखील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

"सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. सरकार काही करेल की नाही ही शंका आहे. हे सरकार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. राज्याची नमो योजना कुठे गेली? ही पिके हातची गेलेली आहेत, कृत्रिम पाऊस होत नाही. शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर शासन आपल्या दारी ही योजना राबवली जात आहे. या योजनेवरुन देखील दानवेंनी टीकास्त्र सोडलंय. 2024 लवकर यायला हवे. शासन त्यांच्या दारी गेलं असतं तर मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असं दानवे म्हणालेत.

सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी

अजित पवारांनी सत्तेत सहभाग घेतल्यानंर सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवार आल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याची पदे अजित पवार यांच्याकडे गेलीत. भाजपची नाराजीच भाजपला भारी जाईल, असा इशारा देखील दानवेंनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT