bacchu kadu criticizes navneet rana and bjp in achalpur  saam tv
लोकसभा २०२४

Bacchu Kadu: अमरावतीत आम्ही जिंकणार, एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही: बच्चू कडू

Amravati Lok Sabha : अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराचा विजय होणार, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुरज मसुरकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमरावतीत आम्ही जिंकणार. एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. एक्झिट पोल म्हणजे थोतांड आहे, असं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान संपलं. यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. ज्यात पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तर अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा या विजयी होऊ शकतात, असं सांगण्यात आलं. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

साम टीव्हीशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले आहेत की, ''भाजपच्याच काळात शेतकऱ्याची लूट झाली नाही, काँग्रेसच्या काळातही शेतकऱ्यांची लूट झाली. एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. हे सर्व अंदाज आहे. कोणाच्या डोक्यात काय भानामती येते आणि एक्झिट पोल जाहीर करतं त्याची गरज नाही. ४ तारखेला सर्व समजेल.''

विधानसभा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, ''भूमिका आम्ही काही इतक्यात जाहीर करत नाही. आमचे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांना घेऊन आम्ही पंधरा ते वीस जागा आम्ही लढू. कोणासोबत जायचं की, नाही जायचं ते कार्यकर्त्यांना घेऊन ठरवू.''

भाजपच्या 400 परच्या घोषणेवर बच्चू कडू म्हणाले, ''400 पार याची चिंता नाही. शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता आहे. घरकुलाचे पैसे अजून भेटले नाहीत. सरकार कोणाचं पण येऊ दे, पण शेतकरी आणि सामान्य माणसाचं भलं होऊ दे, हीच आमची मागणी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेरळ- भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, बदलापूर ते कर्जत वाहतूक ठप्प

Wednesday Horoscope: कौतुक होणार; ५ राशींच्या व्यक्तींच्या पैशांच्या समस्या सुटणार, वाचा आजचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT