रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

ratnagiri earthquake : रत्नागिरीला भूकंपाचा हादरा बसलाय. भूकंपानंतर घाबरून लोक घराबाहेर पळाले.

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसला आहे. रत्नागिरीत २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा हा धक्का ८ वाजून १९ मिनिटांनी जाणवला. रत्नागिरी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. भूकंपाचे धक्क्यानंतर कोणतीही हानी झालेली नाही. तसेच घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु भूकंपाचा हादरा बसल्यानंतर घाबरून लोक घराबाहेर पळाले. रत्नागिरीचा भाग हा दक्षिण भारतात भूकंपाच्या ३ आणि ४ या अत्यंत महत्वाच्या झोनमध्ये येतो.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com