Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांच्या चुका मुलांचा आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत, वागायचं कसं? समजून घ्या

Shreya Maskar

लहान वयात मुलांचा पहिला गुरु हा पालक असतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी वागताना सांभाळून आणि प्रेमाने वागावे. मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होईल अशी कोणती गोष्ट पालकांनी करू नये. पालकांच्या वर्तनाचा मुलांच्या आत्मविश्वासावर प्रभाव पडतो.

पालकांनी मुलांना वेळ द्या

आजकाल पालकांना आपल्या कामाच्या व्यापातून मुलांना वेळ द्यायला मिळत नाही. मुलं अधिक वेळ एकटी असतात. या इंटरनेटच्या युगात मुलांच्या हातात फोन असतोच. मुले मोबाईल कसा वापर करतात, त्यावर काय पाहतात? याकडे पालकांचे लक्ष देखील नसते. त्यामुळे अनेक वेळा काही गोष्टी बघून मुलांच्या मनात भीती बसून राहते आणि पालक मुलांना वेळ देत नसल्यामुळे मुलं सर्व गोष्टी मनात ठेवतात. त्यामुळे पालकांनी मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या.

मुलांची तुलना करू नका

अनेक पालक कळत नकळत किंवा नेहमी आपल्या मुलांची इतर मुलांसोबत तुलना करतात. याचा मुलांच्या मनावर परिणाम होते. मुलं भावनिकदृष्ट्या खचून जातात. पालकांनी समजून घेतले पाहिजे की, प्रत्येक मुलं हे वेगळे असते. तसेच प्रत्येकाची बुद्धिमत्ता देखील वेगळी असते. तुलनेमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. ज्यामुळे त्यांना अवगत आणि आवड असलेली कौशल्यांमध्ये सुद्धा ते मागे पडू लागतात. पालकांनी कधीही मुलांची चेष्टा करू नये. लहान मुलं भावनिक असतात. त्यांच्या मनावर याचा पटकन परिणाम होतो.

वारंवार मुलांची चूक काढणे टाळा

लहान मुलं नेहमी चुकांमधून शिकतात. त्यामुळे पालकांनी वारंवार मुलांची चूक काढू नये. मुलांच्या भावना आणि मते जाणून घ्यावी आणि त्यांचा आदर करावा. कारण तुम्ही नेहमी मुलांना टोकत राहिलात, त्यांच्या चुका काढत राहिलात तर त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. मुलं चुकत असतील, तर त्यांना प्रेमाने समजून घ्या.

मुलांना डिमोटिव्हेट करू नका

पालकांनी मुलांना कधीच कोणत्या कारणांमुळे डिमोटिव्हेट करू नये. तु हे करू शकणार नाही. तुला हे जमणार नाही. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अशी वाक्य बोलू नये. कारण यामुळे मुलांचा आत्मविश्वास पटकन कमी होतो. 'तुला आयुष्यात हवं ते चांगल कर , आम्ही तुझ्यासोबत आहोत' असे पालकांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.

मुलांना रागात मारू नका

अनेक वेळा पालक मुलांच्या वागण्याला कंटाळून त्यांना रागात मारतात. पण हे संपूर्ण चुकीचे आहे. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मुलं तुम्हाला घाबरू लागतात. अशा वेळी पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे.

जबाबदारीची जाणीव

लहान वयापासूनच पालकांनी मुलांना जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांच्यावर काम सोपवली पाहिजे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते लवकर जबाबदार बनतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT