हिवाळ्याला सुरुवात झाली की प्रत्येकाच्या घरात गरम पाण्याचे टोप पिण्यासाठी भरून ठेवले जातात. पण या वातावरणात किती प्रमाण पाणी प्यायलं पाहिजे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. शरीरासाठी पाणी अत्यंत महत्वाचं असलं तरी त्याचे प्रमाण वेळ आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे आपण कमी पाणी प्यायल्याने तुमच्या किडनी आणि मेंदूला धोका निर्माण होतो का? या प्रश्नांचे तज्ज्ञांच्या माहितीनुसार उत्तर जाणून घेणार आहोत.
थंडीत लोक पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करतात. थंड हवेमुळे आणि पाणीही थंड असल्यामुळे अनेक जण दिवसभर खूपच कमी पाणी पितात. मात्र आरोग्य तज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: जे लोक दिवसाला 500 मिलीपेक्षा कमी पाणी पितात, त्यांच्यात मोठ्या समस्या होण्याचा धोका वाढतो. यामध्ये किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचतं यांसारख्या गंभीर गोष्टींचा समावेश आहे.
तज्ञ सांगतात की, शरीरात पुरेसं पाणी नसल्याने किडनीला फिल्टरेशनचे काम करायला जास्त ताण येतो. त्यामुळे लघवी गडद होते आणि शरीरातील पदार्थ योग्य प्रमाणात बाहेर निघत नाहीत. अशी स्थिती जास्तवेळ राहिल्यास किडनीचं नुकसान होऊ शकतं. फक्त किडनीच नाहीतर मेंदूवरही त्याचा परिणाम दिसतो. पाणी कमी प्यायल्याने रक्ताचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे सतत थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड किंवा मूड स्विंग्स यांसारख्या समस्या दिसू शकतात.
हिवाळ्यात कमी पाणी घेतल्यामुळे स्नायूंनाही पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे काम करताना थकवा जाणवणे किंवा मसल्समध्ये वेदना जाणवू शकतात. याशिवाय पचन प्रक्रियेलाही याचा मोठा फटका बसतो. गडद लघवी, तापमान नियंत्रणात अडचण, किडनी फिल्टरेशन रेट कमी होणे यांसारख्या समस्या दीर्घकाळ राहिल्यास पुढे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे थंडीतही दिवसातून पुरेसे पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.