स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'काजळमाया' ही हॉरर मालिका सुरू होणार आहे.
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
स्टार प्रवाहवरील मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून 'काजळमाया' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका दुसरी-तिसरी कोणती नसून 'अबोली'आहे. 'अबोली' मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आहे.
'अबोली' मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता सचित पाटील एकत्र झळकले होते. 2021 मध्ये 'अबोली' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता 4 वर्षांनी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचे 1200 हून अधिक एपिसोड झाले आहेत. मालिकेच्या शेवटच्या दिवसाचा खास व्हिडीओ अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करून तिने सर्वांचे आभार मानले आहे. "अबोली या मालिकेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..." असे कॅप्शन तिने व्हिडीओला दिले आहे.
'अबोली' मालिका रात्री 11 वाजता प्रसारित व्हायची. आजपासून (27 ऑक्टोबर) मात्र रात्री 10:30 वाजता अक्षय केळकरची 'काजळमाया' ही मालिका सुरू होणार आहे. 'काजळमाया' (kajalmaya) ही हॉरर मालिका आहे. या मालिकेत अक्षय केळकर, रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या हॉरर मालिकेत 300 वर्षांपूर्वीची कहाणी पाहायला मिळणार आहे.
27 ऑक्टोबर पासून तुमच्या आवडत्या मालिकांचे वेळ देखील बदलली आहे. 'तू ही रे माझा मितवा' मालिका रात्री 8 वाजता आणि 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' ही मालिका रात्री 11 वाजता पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.