Amitabh bachchan and allu arjun Saam Tv
मनोरंजन बातम्या

KBC 16 : माझी तुलना अल्लू अर्जुनशी करू नका...', 'पुष्पाभाऊ'साठी अमिताभ बच्चन असे का म्हणाले?

KBC 16 Amitabh bachchan : अल्लू अर्जुनसाठी अमिताभ बच्चन यांचे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांची अल्लू अर्जुनसोबत तुलना करण्यास का नकार दिला याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

KBC 16 : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेल्या 'पुष्पा 2' स्टार अल्लू अर्जुनबद्दलचे वक्तव्य चर्चेत आहेत. अलीकडे, 'कौन बनेगा करोडपती 16' होस्ट करताना, बिग बी यांनी कबूल केले की ते अल्लू अर्जुनचे मोठे चाहते आहेत, परंतु त्याच्याशी त्यांची तुलना कोणीही करू नयेत.'कौन बनेगा करोडपती 16' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने 'पुष्प 2' फेम अल्लू अर्जुनाचा उल्लेख केला, त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली. स्पर्धक रजनी बर्नीवाल यांनी अमिताभ बच्चन आणि अल्लू अर्जुन यांचे कौतुक केले.

'माझी त्याच्याशी तुलना करू नका'

बिग बी यांनी स्पर्धकाला अल्लू अर्जुनबद्दल प्रश्न विचारले, ज्यावर तिने उत्तर दिले, 'सर, मी अल्लू अर्जुन आणि तुमची मोठी चाहती आहे.तेव्हा बिग बी हसले आणि म्हणाले, 'अल्लू अर्जुन हा खूप प्रतिभावान कलाकार आहे आणि त्याला मिळालेली ओळख पूर्णपणे पात्र आहे. मीही त्याचा मोठा चाहता आहे. नुकताच तिचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि तुम्ही तो अजून पाहिला नसेल, तर तुम्ही तो नक्कीच पाहावा. पण माझी त्यांच्याशी तुलना करू नका.

दोन्ही कलाकारांमध्ये साम्य आहे

मात्र, दोन्ही कलाकारांमध्ये साम्य असल्याचे स्पर्धक रजनीने आवर्जून सांगितले. ती म्हणाली, 'तुम्हा दोघांचीही अप्रतिम एंट्री टाईमिंग आहे आणि तुमची शैली खूप सारखी आहे. जेव्हा तुम्ही कॉमेडी सीन करता तेव्हा तुम्ही दोघेही तुमची कॉलरवर करता आणि डोळे मिचकावता.' असे कोणत्या चित्रपटात केले असल्याचे बिग बी यांनी विचारले तेव्हा रजनीने त्यांच्या 1977 च्या क्लासिक अमर अकबर अँथनीचे नाव घेत म्हणाली,' तुमच्या दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे . तुमच्या दोघांच्या आवाजात एक विशेष प्रकारची श्रीमंती आहे. तुला भेटल्यानंतर माझे स्वप्न पूर्ण झाले. आता मला अल्लू अर्जुनला भेटायचे आहे.

चेंगराचेंगरी प्रकरण

अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर २०२४ रोजी पुष्पा २ प्रीमियरच्यावेळी संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात एका महिलेचा मृत्य आणि तिच्यामुळगा गंभीर जखमी झाला होता. आली अर्जुनला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर, उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, कागदोपत्री उशीर झाल्याने त्यांना एक रात्र तुरुंगात काढावी लागली. या आठवड्याच्या सुरुवातीला अल्लू अर्जुनचीही हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात चौकशी केली आणि अल्लू अर्जुनच्या बॉडी गार्डला त्याच्यामुळे धक्काबुक्की झाल्यामुळे तुरुंगात जावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; आता क्रीडा खातं कोणाकडे? जाणून घ्या

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

SCROLL FOR NEXT