Shah Rukh Khan And Gauri Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Birthday: बॉलिवूडचा 'रोमान्स किंग' शाहरुख गौरीच्या प्रेमात कसा पडला?, अभिनेत्याने एकदा नाही तर ३ वेळा केलं लग्न

Priya More

Shah Rukh Khan Love Story:

बॉलिवूडचा 'बादशाह' आणि 'किंग खान' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज आपला 58 वा वाढदिवस (Shah Rukh khan Age) साजरा करत आहे. शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये शाहरुखचे फॅन्स आहेत. आजही या वयामध्ये शाहरूख खान बॉलिवूडच्या फिट आणि हँडसम अभिनेत्यांना टक्कर देतो. शाहरुख खानच्या अभिनयाचा प्रवास काही सोपा नव्हता. अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर शाहरुखने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा किंग खान म्हटलं जातं.

शाहरुख खानच्या आयुष्याबद्दल त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायला प्रचंड उत्सुकता असते. लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शाहरुख खानला मात्र त्याचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती असे सांगितले तर कोणाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या आणि गौरीच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेणार आहोत....

बॉलिवूडचा रोमान्स किंग

शाहरुख खानने 1989 मध्ये ‘फौजी’ या टीव्ही शोमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. या शोनंतर त्याने 'सर्कस', 'दिल दरिया' या शोमध्ये देखील काम केले. या टीव्ही शोद्वारे त्याने खरी ओळख निर्माण केली. त्यानंतर शाहरुखने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिवाने' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्याने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याकाळी शाहरुख खानची डिमांड खूप होती. एकापाठोपाठ एक चित्रपट त्याला मिळत गेले. त्यावेळी तो बॉलिवूडचा टॉप अभिनेता होता. त्यानंतर शाहरूख खानला 'रोमान्स किंग' म्हणून ओळख मिळाली. लाखो तरूणी त्याच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या. पण शाहरुख दुसरीच्याच प्रेमात पडला होता. शाहरुख खान गौरीच्या प्रेमात अक्षरश: वेडा झाला होता. लग्न करेल तरफक्त गौरीसोबतच असं त्याने ठरवलंच होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशी झाली गौरीची भेट

१९८४ सालची गोष्ट आहे जेव्हा दिल्लीच्या पंचशील क्लबमध्ये सुरू असलेल्या एका पार्टीत १९ वर्षांच्या शाहरुखची नजर १४ वर्षांच्या गौरीवर पडली. शाहरुख फक्त तिच्याकडे बघतच राहिला. त्या पार्टीत शाहरुख खानने गौरीला दुसऱ्या मुलासोबत डान्स करताना पाहिलं आणि तो गौरीच्या प्रेमात वेडा झाला. पण त्या दिवशी लाजाळू शाहरुखला गौरीशी बोलण्याचे धाडस झाले नाही. त्यानंतर गौरी ज्या ज्या पार्टीत हजेरी लावायची. त्या-त्या पार्टीत शाहरुखही हजेरी लावायचा. 25 ऑक्टोबर 1984 रोजी झालेल्या तिसऱ्या भेटीत शाहरुखने गौरीच्या घरचा फोन नंबर मिळवला.

कोडवर्डने एकमेकांशी बोलायचे

शाहरुखला गौरी खूप आवडली होती. शाहरुखने तिच्याशी फोनवर बोलण्याचा मार्ग देखील शोधला होता. तो त्याच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून गौरीच्या घरी फोन लावायचा. गौरीच्या घरी जो कोणी फोन उचलेल त्याला शाहरूखची मैत्रीण शाहीन बोलत आहे असे सांगायची. शाहीन हा त्यांचा कोडवर्ड होता. जे नाव ऐकून गौरी समजून जायची की हा शाहरुखचा फोन आहे. त्यामुळे गौरीच्या घरी कोणालाच संशय यायचा नाही आणि दोघेही तासंतासं गप्पा मारत बसायचे. गौरी आणि शाहरुखची भेट फक्त पार्टींमध्येच व्हायची. जिथे गौरीच्या मैत्रिणी देखील असायच्या. त्यानंतर हळूहळू दोघे लाँग ड्राइव्हला देखील जाऊ लागले.

शाहरुखने गौरीला असा केला प्रपोज

शाहरुख खान एकदा गौरीला घरी सोडायला गेला. तिच्या घराबाहेर त्याने गाडी उभी केली. गौरी गाडीवरून उतरत असताना शाहरुखने तिला माझ्यासोबत लग्न करशील का असं विचारलं? त्यानंतर गौरीचं उत्तर न ऐकताच शाहरुख तिथून गाडी घेऊन निघून गेला. गौरी देखील शाहरुखच्या प्रेमात पडली होती. तिने त्याला लग्नाला होकार दिला खरा. पण लग्नासाठी धर्म आडवा येत होता. शाहरुख मुस्लिम आणि गौरी हिंदू होती. त्यामुळे गौरीसोबत लग्न करण्याचा मार्ग खूपच कठीण होता. अशा परिस्थितीत लग्नाच्या वेळी दोघांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.

गौरीच्या भावाने शाहरुखवर रोखली होती बंदूक

गौरीचे कुटुंबीय या लग्नाला तयार नव्हते. शाहरुख खान लग्नाबाबत बोलण्यासाठी गौरीच्या भावाकडे गेला होता. त्यावेळी संतप्त होत गौरीच्या भावाने त्याच्यावर बंदूक रोखली होती. गौरीच्या कुटुंबीयांना शाहरुखचे अॅक्टिंग करणं आवडत नव्हते. त्यामुळे ते या लग्नाला विरोध करत होते. अनेक अडचणींवर मात केल्यानंतर अखेर शाहरुखची गौरीसोबत लग्न करण्याची इच्छा पूर्ण झाली. अखेर लग्नासाठी गौरीच्या कुटुंबीयांनी परवानगी दिली. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले.

शाहरूखने गौरीसोबत ३ वेळा केलं लग्न

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि गौरीने एक नाही तर 3 वेळा लग्न केले. या मागचे कारण म्हणजे, दोघांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळे आधी दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यानंतर मुस्लिम पद्धतीने निकाह देखील केला. आज शाहरूख खान आणि गौरी बॉलिवूडचे सर्वांत फेमस कपल आहे. शाहरूख आणि गौरीचा संसार खूपच सुखी सुरू आहे. त्यांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT