Bihar Police Praised Ayushman Khurana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bihar Police Praised Ayushman Khurana: बिहार पोलिसांनी मानले आयुष्यमान खुरानाचे आभार; कारणही आहे तेवढंच खास

Chetan Bodke

Dream Girl 2 Actor For Raising Awareness Cyber Crime: राज शांदिल्या दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल २’ची अनेक वेळा प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. अखेर हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून आयुष्मान खुराना चित्रपटातील पात्रामुळे बराच चर्चेत आला आहे. त्याने चित्रपटात पूजाचे पात्र साकारले असून त्याचा अभिनय प्रेक्षकांना फारच भावतोय. आता त्याच आयुष्मानचे थेट बिहार पोलिसांनी आभार मानले, नेमकं काय आहे कारण जाणून घेऊया...

उत्तम कवी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सर्वश्रृत राहिलेल्या आयुष्मानचे नुकतेच बिहार पोलिसांनी मानले आहेत. बिहारच्या समस्तीपूर पोलिस युनिटने आयुष्मानचे त्याच्या ड्रीम गर्लमधल्या अभिनयासाठी त्याचे कौतुक केले.

निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी चित्रपटात एक संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. चित्रपटात सायबर क्राईम हा विषय अगदी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात आयुष्मानने पुजा नावाचे पात्र साकारले.

आयुष्मानने पुजाच्या भूमिकेत सायबर फसवणूकीचा प्रकार थांबवण्याचा प्रकार करत असल्याने, बिहार पोलिसांनी आयुष्यमानचे आभार मानले आहेत.

सायबर फसवणुकीविरोधात पोलिसांसोबत आश्चर्यकारकपणे आम्हाला मदत करत असल्याने बिहार पोलिसांनी आयुष्मानला ट्वीट केले आहे. बिहार पोलिसांनी आयुष्मानला टॅग करत ट्विट केले की, “चित्रपटाची स्टोरी सायबर फसवणुकीविरोधाच्या लढ्यात जनजागृती करण्यासाठी पोलिसांना मदत करतेय. वास्तविक चित्रपट सायबर फ्रॉड कॉलच्या अगदी जवळ नेणारा ठरला आहे. कृपया तुम्ही असेच आमच्यासोबत जनजागृती करत रहा. शुभेच्छा आणि समस्तीपूरमध्ये आपले स्वागत आहे.”

आयुष्मान नेहमीच भारतात दमदार विषयासाठी ओळखला जातो. आपल्या उत्तम कथानकेतून त्याने प्रेक्षकांचे मने जिंकले आहे. आयुष्मानच्या चित्रपटाची कथा दैनंदिन आयुष्यात उघडपणे न बोलले जाणारे विषय हाताळत असल्याने तो सध्या चर्चेत आला. आता समस्तीपूर पोलिसांनी देखील ‘ड्रीम गर्ल २’ मधील कथेसाठी त्याचं कौतुक केलं आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे सोबत परेश रावल, असरानी, राजपाल यादव, मनजोत सिंग आणि अनु कपूरसारख्या दमदार कलाकारांची फौज चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून अनेकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाला आहे. यापूर्वी चित्रपट २५ जुलैला रिलीज होणार होता पण काही कारणास्तव निर्मात्यांनी तारीख बदलली. एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी चित्रपटाती निर्मिती केली तर राज शांडिल्य दिग्दर्शिन केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT