Pulses Price Hike saam Tv
बिझनेस

Pulses inflation : महंगाई डायन... ऑक्टोबरपर्यंत डाळींचे भाव कमी होणार नाहीत, मोठं कारण आलं समोर

Pulses inflation News : डाळींचे भाव देखील कमी होताना दिसत नाही. या डाळींचे भाव पुढील काही कमी होणार होणार नाहीत, असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे डाळींचा पुरवठा कमी झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : देशातील खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. डाळींचे भाव देखील कमी होताना दिसत नाही. या डाळींचे भाव पुढील काही कमी होणार होणार नाहीत, असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे डाळींचा पुरवठा कमी झाला आहे.

ऑक्टोबरपर्यंत दिलासा नाही

ईटी रिपोर्टनुसार, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बाजारात नवीन मालाची आवक येत नाही, तोपर्यंत बाजारात डाळींचे दर कमी होत नाही. बाजारात नवीन मालाची आवक ऑक्टोबर महिन्यात सुरु होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना ऑक्टोबरपर्यंत दिलासा मिळणार नाही.

डाळींचे दर का वाढले?

बाजारात डाळींची मागणी आहे. मात्र, त्यानुसार मालाचा पुरवठा होत नाहीये. मागणी आणि पुरवठ्याच्या गणितात बिघाड झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. डाळींचे दर वाढल्याने इतर पदार्थांच्या दरावरही परिणाम पाहायला मिळत आहे.

सरकारकडून डाळींच्या किमतींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारत डाळींचा मोठा उत्पादक आहे. तरीही भारताला डाळी आयात करावा लागल्यात.

बाजारात तूर डाळ, चना डाळ, उडद डाळींच्या दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर १६.८ टक्के होता. सर्वात अधिक ३१.४ टक्के तूर डाळ महाग होती. चना डाळीमध्ये १४.७ टक्के होती. तर उडद डाळीत १४.३ टक्के महागाई होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT