Investment Tips Google
बिझनेस

Investment Tips: वर्षाला १ लाख रुपये गुंतवा अन् १ कोटी रुपये कमवा;कसं ते जाणून घ्या

Siddhi Hande

प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. आपल्या भविष्यासाठी खूप आधीपासूनच गुंतवणूक करायची असते.तुम्ही जर एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला चांगले व्याज मिळते. याच व्याजावर तुम्हाला परत व्याज मिळते. त्यालाच चक्रिवाढ व्याज म्हणतात.

चक्रिवाढ व्याजामुळे तुमचे पैसे कधी कधी दुप्पटदेखील होतात. जर तुम्ही एकदा १ लाखाची गुंतवणूक केली तर ६० वर्षांपर्यंत तुमचे पैसे खूप वाडतील. जर तुमच्या गुंतवणूकीवर १२ टक्के व्याजदर मिळाले तर ६० वर्षांपर्यंत किती पैसे जमा होतील ते जाणून घेऊया.

जर तुम्ही वयाच्या विसाव्या वर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या ६० वर्षापर्यंत १ कोटी रुपये मिळतील.तुमचे दरवर्षीचे किंवा प्रत्येक महिन्याचे व्याज आणि त्यावर लागणाऱ्या चक्रीवाढ व्याजदरामुळे तुमचे पैसे १०० टक्के वाढू शकतात.

जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ३० टक्के नफा होईल. तुमचे पैसे जवळपास ३० लाखांपर्यंत वाढतील. त्यामुळे कमी वयात गुंतवणूक केलेली कधीही चांगले असल्याचे सांगितले जाते.

तुम्ही जर ४० व्या वर्षी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला १२ टक्के रिटर्न मिळेल. त्यामुळे ६० व्या वर्षी तुम्हाला १० लाख रुपये मिळतील.त्यामुळे योग्य वयात गुंतवणूक करणे हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने चांगले असते.

एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ म्हणजे २० वर्ष. त्या काळात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप फायदा मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT