Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha Rain : वर्धेत पावसाची उघडीप; शेतकऱ्यांची चिंता वाढली, स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : सुरवातीला मान्सूनचा पाऊस आल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीचे काम केले होते. चांगला पाऊस झाल्यामुळे पिके देखील उंगली होती. मात्र यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके मान टाकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आता पिकांना वाचविण्यासाठीची धावपळ सुरु झाली आहे. 

वर्धा (Wardha) जिल्ह्यात सुरवातीला पेरणी अनुकूल पाऊस झाला. या पावसानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलीय. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर मात्र पावसाने उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी आता शेतकरी धडपड करत असून स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न (Farmer) शेतकरी करत आहे. बागायतदार शेतकरी पिकांना पाणी देऊ लागले आहेत. 

तर करावी लागणार दुबार पेरणी 

सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी पाऊस (Rain) नसल्याने पिकांना वाचविण्यासाठी पाणी देत आहेत. मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही; अश्या शेतकऱ्यांना पाणी देता येणे शक्य नाही. यामुळे आगामी काही दिवसात पाऊस झाला नाही तर त्यांच्यावर दुबार पेरणीच संकट आले आहे. अद्यापही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली नाहीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT