Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha Rain : वर्धेत पावसाची उघडीप; शेतकऱ्यांची चिंता वाढली, स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न

Wardha News : वर्धा जिल्ह्यात सुरवातीला पेरणी अनुकूल पाऊस झाला. या पावसानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलीय

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : सुरवातीला मान्सूनचा पाऊस आल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीचे काम केले होते. चांगला पाऊस झाल्यामुळे पिके देखील उंगली होती. मात्र यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके मान टाकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आता पिकांना वाचविण्यासाठीची धावपळ सुरु झाली आहे. 

वर्धा (Wardha) जिल्ह्यात सुरवातीला पेरणी अनुकूल पाऊस झाला. या पावसानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलीय. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर मात्र पावसाने उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी आता शेतकरी धडपड करत असून स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न (Farmer) शेतकरी करत आहे. बागायतदार शेतकरी पिकांना पाणी देऊ लागले आहेत. 

तर करावी लागणार दुबार पेरणी 

सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी पाऊस (Rain) नसल्याने पिकांना वाचविण्यासाठी पाणी देत आहेत. मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही; अश्या शेतकऱ्यांना पाणी देता येणे शक्य नाही. यामुळे आगामी काही दिवसात पाऊस झाला नाही तर त्यांच्यावर दुबार पेरणीच संकट आले आहे. अद्यापही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली नाहीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT