Sambhajinagar News Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar News : मोसंबीच्या बागा सुकल्या; पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Sambhajinagar : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांसह इतर फळबागांची लागवड केली आहे. मात्र आतापर्यंत तळ हाताप्रमाणे सांभाळलेल्या या बागा अत्यल्प पावसाच्या प्रमाणामुळे यंदा पाण्याअभावी धोक्यात सापडल्या

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने तापमानाने देखील उच्चांक गाठला आहे. अशातच भूगर्भातील जलसाठा अत्यंत खालावला आहे. शेतात असलेले पीक व बागांना पाणी देता येणे शक्य नाही. यामुळे (sambhajinagar) संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबीच्या बागा सुकल्या आहे. या वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे. 

यंदा कमी पाऊस (Rain) त्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्याबरोबरच शेतातील विहिरींनी देखील तळ गाठल्याने शेतकऱ्यांच्या (Farmer) मोसंबीच्या बागा आता सुकायला लागल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्हामध्ये दिसून येत आहे.  त्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. 

बाग वाचविण्याचा आटापिटा 

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांसह इतर फळबागांची लागवड केली आहे. मात्र आतापर्यंत तळ हाताप्रमाणे सांभाळलेल्या या बागा अत्यल्प पावसाच्या प्रमाणामुळे यंदा पाण्याअभावी धोक्यात सापडल्या आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या भागावर कुऱ्हाडी देखील चालवण्याचे चित्र दिसून आलं. तर काही शेतकरी आपल्या बागा वाचविण्यासाठी टँकरचे विकतचे पाणी घेऊन आटापिटा करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT