Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवरील अळीचा प्रादुर्भाव कमी होईना; शेतकरी चिंताग्रस्त

Dharashiv News : सध्या हे पिक फुलोरा, शेंगा लागणे व शेंगा पक्वतेच्या महत्वाच्या अवस्थेत आहे. असे असताना गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली असली तरी सातत्याने ढगाळ वातावरण कायम आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदा पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर पाऊस सुरूच आहे. मध्यंतरी पाऊस थांबला होता. या कालावधीत पिके चांगल्या प्रकारे तरारली होती. दरम्यान मागील पंधरा- वीस दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे पिकांवर रोगराई पडण्यास सुरवात झाली. यात सोयाबीन पिकांवर आळीचा प्रादुर्भाव वाढला असून फवारणी केल्यानंतर देखील प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

धाराशिवच्या (Dharashiv News) भुम तालुक्यात यंदा खरीप हंगामात पेरणी क्षेत्राच्या जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली. सध्या हे पिक फुलोरा, शेंगा लागणे व शेंगा पक्वतेच्या महत्वाच्या अवस्थेत आहे. असे असताना गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली असली तरी सातत्याने ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे (Soyabean Crop) सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर अळ्यांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी फवारणी करत आहेत. मात्र तरीही अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी (Farmer) हतबल झाला आहे. महागडी औषधी घेऊन फवारणी केल्यानंतर देखील फायदा होत नसल्याने खर्चात भर पडत आहे. यात उत्पादन घटण्याची  शक्यता अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT