मनोज जयस्वाल
वाशीम : उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानात देखील आता वाढ होण्यास सुरवात झाली आहे. या वाढत्या तापनामाचा फटका फळपिकांना बसण्यास सुरवात झाली आहे. यानंतर आता मिरचीवर देखील तापमानाचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मिरचीवर मावा आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिरचीच्या लागवडीनंतर दोन महिन्यांत काढणीला सुरुवात होते आणि सुमारे तीन ते चार महिने नियमित उत्पादन मिळते. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दर मिळत असून हा दर हंगामानुसार चढ- उतार होतो. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने मिरचीवर फूलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे कीटक मिरचीच्या फुलांचे आणि पानांचे नुकसान करून उत्पादन घटते.
ऐन हंगामात नुकसान
वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड होते. अवघ्या ५० ते ६० दिवसांत काढणीसाठी तयार होणारे हे नगदी पीक असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे मावा आणि फूलकिडीसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून ऐन हंगामात उत्पादन घटनेची शक्यता आहे.
उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका
मिरची तोडणीला सुरवात झाली असून तापमान वाढीमुळे मिरचीवर रोगराई पसरू लागली आहे. याचा फटका म्हणजे उत्पादनात घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रोगराई कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे यामुळे आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.