हिंगोली : कापसाला भाव नसल्याचे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या दरम्यान राज्यभरात केंद्र शासनाच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले होते. मात्र या केंद्राकडून गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांची कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून केंद्राच्या बाहेर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत.
यंदाच्या हंगामात कापसाला सहा ते सात हजार प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र अजूनपर्यंत कापसाच्या दरात कोणत्याही प्रकारे भाव वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत नाही. यामुळे बहुतांश शेतकरी मिळेल त्या दरात कापूस विक्री करत आहे. तर केंद्र शासनाने देखील सीसीआय खरेदी केंद्र सुरु केले होते.
कापूस विक्रीविना गाड्या उभ्या
दरम्यान सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने हिंगोलीमध्ये कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा मनस्ताप झाला आहे. हिंगोलीच्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या गाड्या कापूस विक्री विना थांबल्या असून केंद्राच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. केंद्रावरील सदरची खरेदी कधी सुरु होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
तांत्रिक अडचणीचे कारण
दरम्यान मागील तीन दिवसांपासून सीसीआयच्या खरेदी केंद्रावर खरेदी थांबली आहे. परंतु शासनाने कापूस खरेदी बंद केली नसून सर्वरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया थांबली असल्याचे स्पष्टीकरण हिंगोलीच्या कापूस खरेदी करणाऱ्या सीसीआय खरेदी केंद्राकडून देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील खरेदी सुरु होण्याची प्रतीक्षा कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.