मुंबई: देशात सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यादरम्यान राजकीय पक्षांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. यादरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होणार, हे नक्की आहे. किती योजना घोषित केल्या, तरीही काहीही होणार नसल्याचा विश्वास त्यांनी विश्वास व्यक्त केलाय.
नागपूर हा कोणाच्या नावावर असलेला सातबारा आहे का, असा सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला आहे. ईडी पोलीस आणि सीबीआय सोडलं तर फडणवीस यांच्याकडे काहीही नसल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. वाराणसीमध्ये जिंकण्यासाठी मोदींची धडपड झाली तर देवेंद्र फडणवीस देखील सहज पराभूत होवू शकतात, अशी टीका राऊत यांनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.