पुढच्या ५ वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७५ हजार जागा वाढवल्या जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हंटलं आहे. आज संसदेत आठवा अर्थसंकल्प त्या सादर करत आहे.
यात राष्ट्रीय कौशल्य केंद्र उत्कृष्टता मागील योजनांवर आधारित ५ राष्ट्रीय कौशल्य केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. तसंच आयआयटीमध्ये क्षमता वाढवली जाणार आहे. आयआयटीमध्ये शिकणाऱ्यांची संख्या वाढली जाणार आहे. आयआयटी पाटणामध्ये सुविधांना चालना देण्यात येणार आहे. यामध्ये ६ हजार ५०० विद्यार्थ्यांसाठी जागा वाढवल्या जातील. एआयसाठी ५०० कोटी रुपयांच्या बजेटसह एक संस्था स्थापन केली जाईल. पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात १० हजार जागा वाढवल्या जातील. सरकारी शाळांमध्ये अटल टिकरींग लॅब सुरू करण्यात येतील. भारतीय भाषांमधील पुस्तकांना प्रोत्साहन दिलं जाईल. डिजिटल शिक्षण संसाधनांची चांगली उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.