बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला आहे. सरपंच हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींच्या अटका पुण्यातूनच कशा होतात? असा थेट सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीआयडी आणि स्पेशल एसआयटी टीमकडून तपास सुरू आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड याने पुण्यात सरेंडर केल्यानंतर आता उर्वरित मुख्य २ आरोपींना देखील पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारला सवाल विचारला आहे. उशिरा का होईना आरोपींना अटक झाली आहे. मात्र सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यतूनच अटक कशी होते? असा प्रश्न सुळे यांनी विचारला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.