Sharad Pawar: त्याचे परिणाम आम्ही महाराष्ट्रात भोगलेय... बिहार निकालावर शरद पवार असे का म्हणाले? VIDEO

Sharad Pawar Comments On Bihar Election Results: बिहार निवडणुकीनंतर शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वी १० हजार रुपयांचे वाटप हा भ्रष्टाचार असल्याचे म्हटले. महाराष्ट्रातही तेच झाले आणि त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत.

बिहार निवडणुकीवर देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी 10 हजार रुपये वाटप करणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. आणि ते सरकारने केले आहे. महाराष्ट्रातही तेच झाले होते. त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी पैशाचे वाटप केले होते. आम्ही अजून काही ठरवले नाही. कालच निकाल आला आहे. पण ही गोष्ट आम्ही डोळे झाक करणार नाही. काही दिवसात संसदेचे अधिवेशन सुरू होईल. तेव्हा विरोधकांची मिटिंग आम्ही बोलावू. त्यात आम्ही याबाबतचा विचार करू. ही गोष्ट सोपी नाहीये. सत्ता ज्यांच्या हातात आहे. ते त्या अधिकाराचा वापर पैसे वाटण्यात करत आहे. निवडणूक सिस्टम करप्ट मार्गावर नेत आहे. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही यावर चर्चा करून काही तरी करू. पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली. याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com