आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी यावेळी मात्र अत्यंत संवेदनशील आणि मदतीचा हात पुढे करत एक नवा आदर्श निर्माण केलाय. अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना तातडीने दिलासा देण्यासाठी त्यांनी स्वतःचे 2 भूखंड विकून त्यातून येणारी 25 लाख रुपयांची रक्कम, मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केलीय. आमदार संजय गायकवाडांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय
राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झाला आहे. त्याच्या मदतीला आमदार संजय गायकवाड धाऊन आले आहेत. त्यांनी स्वतःचे दोन प्लॉट विकून आलेली 25 लाख रुपये सरळ मुख्यमंत्री फंडामध्ये जमा केली आहे. त्याचा डी डी काढून जमा करण्यात येणार आहे. हे राज्यातील पहिले आमदार संजय गायकवाड आहेत त्यांनी तातडीने आपली संपत्ती विकून शेतकऱ्यांना मदत केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.