शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? रामदास आठवलेंनी कवितेतून सगळंच सांगितलं|VIDEO

Ramdas Athawale Poem For Farmers: बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कवितेतून शेतकऱ्यांना धीर दिला आणि सरकारची मदत मिळेल अशी खात्री दिली.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलाय या भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे बीड जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांनी कवितेतून शेतकऱ्यांना धीर दिला. या शेतकऱ्यांना सरकारची आहे साथ... त्यांना मदत नक्कीच मिळेल... त्यावेळी त्यांच्या पाठीवरून फिरवीन हात .. अशा शब्दात रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांना सरकार मदत देणार असल्याचे सांगत आपण यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com