महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धडाधड प्रश्न निवडणुक आयोगाला विचारले. निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी का बंद केली? असा प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. त्यामुळे नुकतेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही असेही राज म्हणाले. जे आज 18 वय पूर्ण करत आहेत, त्यांनी मतदान करू नये का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. अनेक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी मतदारांची नावे आहेत, त्याचे काय करायचे.मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाच काय करायचे असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगापुढे उपस्थित केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.