शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहार महासंघटनेने मशाल पेटवून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. सरकार स्थापन होऊन शंभर दिवस उलटूनही शेतकरी कर्जमाफीबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे प्रहार संघटनेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. आंदोलनाच्या वेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.