शेतकरी प्रश्नावर बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक, मंत्रालयाबाहेर हायव्होलटेज ड्रामा,आंदोलक पोलिसांच्या ताब्यात|VIDEO
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी विविध प्रश्नांसाठी उपोषनाच हत्यार उपसले आहे. आज या उपोषनाचा चौथा दिवस आहे. राज्यभरातील अनेक नेत्यांनी कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत बच्चू कडू यांनी उपोषण न सोडण्याचा निर्धार घेतल्याने प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले असून पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट पाहायला मिळाली.
शेतकरी प्रश्नावर बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली असल्याने मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेनं सरकारच्या विरोधात आज आंदोलन सुरू केलं आहे. अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. सरकार दखल घेत नसल्याने कडूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.