पालघर: आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा संघर्ष थांबता थांबेना कोट्यावधी चा निधी जातो कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रायकर पाडा हे वीस घरांचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तराफ्याच्या सहाय्याने वैतरणा नदी पार करावी लागत आहे .सोनाळे गावात शाळा असल्याने वारा, पाऊस व नदीच्या पाण्यात ओले झालेले शाळेचा गणवेश वह्या, पुस्तकांची पार अवस्था होत असते.
अशा परिस्थितीत डोक्यावर भितीची टांगती तलवार असतानाही हे विद्यार्थी जिद्दीने प्रवास करत शाळा गाठत असतात.गायकर पाडा या गावातील १५ विद्यार्थी दररोज सोनाळे येथील हायस्कूल मध्ये जाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. २ विद्यार्थी जि.प.शाळा कापरी, एक विद्यार्थी वाडा कॉलेज अशा एकूण १८ विद्यर्थ्यांना दररोज रोज शिक्षणासाठी हा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नदी ही रुद्रावतार धारण करत असते. नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना असा धोकादायक प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यां बरोबरच गरोदर माता, आबाळ वृद्ध, रुग्ण नागरिक यांचीही गैरसोय होत असून त्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मुला बाळांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही आमची कोणी दादच घेत नाही. त्यामुळे आम्हाला अत्यंत कठीण परिस्थितीत जगावे लागत आहे. असी परिस्थिती येथील ग्रामस्थांची झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.