भारताचे नंदनवन असलेलल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. यामध्ये काही कुटुंब हे महाराष्ट्रातील पुणे आणि डोंबिवली येथील होते.
या हल्ल्यानंतर अनेकांचे रक्त खवळले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तीनही सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचे बैठकीचे सत्र सुरू होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच मध्यरात्रीच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी नागरिक हे भयभीत झाले होते आता मात्र पर्यटक येण्यास तेथे सुरुवात झाली असून काश्मीर हे भारताचे आहे असा ठाम विश्वास तेथील पर्यटकांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.