भारताने २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जोरदार बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर भारतीय वायुदलाने निशाण्यावर हल्ले केले. या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अजहर ठार झाले का, याबाबत सध्या सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयावर जोरदार हल्ला केला असून, त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. या कारवाईत जैशचे सुमारे ५० दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच, मुरीदकेतील लष्करच्या तळावर हल्ला करून अनेक टॉप कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र, मसूद अजहर आणि हाफिज सईदच्या मृत्यूची पुष्टी अद्याप झालेली नाही.
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. त्यांनी भारतीय हल्ल्याची कबुली देत म्हटले आहे की, भारताच्या कारवाईमुळे आम्ही युद्धासाठी मजबूर झालो आहोत आणि आम्हाला उत्तर देण्याचा संपूर्ण हक्क आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.