'देवेंद्र फडणवीस यांनी मला गोळ्या जरी घातल्या तरी मी इथून जात नाही, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू असताना जरांगेंनी हे विधान केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'आम्ही सरकारला दोन वर्षे वेळ दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मला इथे गोळ्या जरी घातल्या तरी मी इथून उठत नसतो. मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही.'
जरांगे यांनी पुढे सांगितले की, 'पोरं हुल्लडबाजी करत नाही सरकार हुल्लडबाजी करत आहे. माजमस्तीत जगणाऱ्या, माजलेल्या मुख्यमंत्र्याने जाणूनबुजून मराठ्यांचा प्रश्न सोडवला नाही. देवेंद्र फडवणीस यांनी गोळ्या जरी घातल्या तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जात नसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब तुमच्या एका चुकीमुळे देशाला डाग लागू शकतो. मोदी साहेबांना, शहासाहेबांना ही डाग लागेल. मला हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, आंदोलकावरील गुन्हे माघारी, सगे सोयरे अधिसूचनेचे काय झालं ते पण पाहिजे. माझ्या पोराला कोणी हात लावायचा नाही. पोर शांत आहेत. पण देवेंद्र फडणवीस सर्व घडून आणत आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.