राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये आधी जिल्हा परिषद व पंचायत समित्या, त्यानंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका निवडणुका घेण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात काही मुद्दे न्यायालयीन वादात अडकले आहेत.
जिल्हा परिषद गणांचे आरक्षण चक्रानुक्रमे न करता नव्याने करण्यात आल्याचा आरोप होत असून याविरोधात काही जणांनी न्यायालयाची धाव घेतली आहे. तसेच जिल्हा परिषद गटांच्या नव्या रचनेलाही आव्हान दिले गेले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या निवडणुका आधी होणार जिल्हा परिषद की नगरपालिका हे आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.