राज्याच्या विविध भागांमध्ये आगामी २४ ते ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या भागांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आणि पुराच्या धोकादायक भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.