गेल्या १० महिन्यांत राज्यात १४ लाख नवे मतदार नोंदले गेले.
विधानसभा निवडणुकीतील आक्षेप घेतलेली नावे वगळण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी लागू राहणार.
नव्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार.
गेल्या दहा महिन्यांत म्हणजेच विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात तब्बल १४ लाख नवीन मतदारांची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवण्यात आलेल्या नावांची पडताळणी करुन ती नावे वगळण्यात आली आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची अद्ययावत मतदार यादीच लागू राहणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेले मतदार यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.