पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक धोरण अवलंबलं आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलं. पाकिस्तान्यांना भारतात प्रवेशबंदी करण्यात आली. पाकिस्तानची मुजोरी आणि दहशतवाद मोडून काढण्यासाठी भारतानं कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिल्लीत केंद्र सरकारची दुपारी ३ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यापर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमडळासह ४ महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा अॅक्शन प्लॅन तयार केल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.