ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानी आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवाद्यांना कंठस्नान करत ऐतिहासिक कामगिरी केली. या ऑपरेशननंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे किंबहुना वाढला आहे.
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय सैन्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, आता बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफ सारख्या सर्वप्रमुख लष्कर दलाच्या जवानांना पूर्ण दक्षतेने आपल्या कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या सोबतच सीमा भागांमध्ये आता अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असून अधिकचे युद्ध साहित्य देखील आणण्यात आले आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.