क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यांमधील वादग्रस्त घटनांनंतर, आयसीसीने अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने पाकिस्तानी खेळाडू हॅरिस रौफला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे, तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या ३० टक्के दंड ठोठावला आहे. याशिवाय जसप्रीत बुमराहवरही एका डिमेरिट पॉईंटची कारवाई करण्यात आली. या कठोर निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, खेळाडूंच्या मैदानातील वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.