हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद पावसामुळे भिजली आहे. मार्केट कमिटीच्या यार्डामधील पत्रे फुटल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या हळदीमध्ये पाणी शिरले आहे, तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची भिजलेली हळद योग्य भावाने खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे, विशेष म्हणजे देशात सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, याच हिंगोली जिल्ह्यात बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा माल असुरक्षित झाला आहे. याकडे राज्याच्या सरकारसह हिंगोली जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर सध्या हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये संचालक मंडळ बरखास्त झाल्याने जिल्हा उपनिबंधाची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.